Prerna nursery

Prerna nursery nagpur orange,kagzi lemon,sweetlemon, seedling & poly bag plants supplyer ,we supply all over India

29/03/2023
12/10/2022

New season start

04/10/2022

चमत्कारी नींबू

Taiwan pink guava
17/07/2021

Taiwan pink guava

Only 6 months keshar mango plot madhya pradesh
16/03/2021

Only 6 months keshar mango plot madhya pradesh

*आंबिया बहार घेण्याचे तंत्र*_संत्र्याला वर्षातून दोनदा फुलं येतात. एकदा जानेवारी - फेब्रुवारी मध्ये व दुसऱ्यांदा जुलै मध...
27/02/2021

*आंबिया बहार घेण्याचे तंत्र*
_संत्र्याला वर्षातून दोनदा फुलं येतात. एकदा जानेवारी - फेब्रुवारी मध्ये व दुसऱ्यांदा जुलै मध्ये. पहिल्या बाराला आंबिया तर दुसऱ्या बाराला मृग बहार म्हणतात. झाड सशक्त झाले तर एकाच झाडावर आंबिया व मृग असे दोन्ही बार घेता येतात. याव्यतिरीक्त कधी कधी तिसरा बार पण येतो तो म्हणजे हस्त बहार. साधारण ऑक्टोंबर महिन्यात हा बार येतो. संत्र्याला वर्षातून तीन वेळा नवीन पान (नवती) फुटतात. जानेवारी - फेब्रुवारी, जुलै - ऑगस्ट व ऑक्टोंबर हे ते नवती फुटण्याचे तीन काळ आणि साध्यचा काळ हा आंबिया बहराचा आहे तर आपण त्यच्या बद्दल थोडीशी माहिती बघूया.
१.१: *आंबिया बहार* : आंबिया बहार हा साधरणतः फेब्रुवारी महिन्यात फुटतो. पण तो फुटण्याची क्रिया मागील सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यातच सुरू झालेली असते. या क्रियेचा अनुक्रम खालीलप्रमाणे:
१. संत्र्याला सप्टेंबर महिन्यात नवती फुटते. नवती पहिले १-२ महिने जुन्या पानांतील व फांद्यातील अन्नद्रव्यावर जगते.
२. नवतीची पानं मोठी झाल्यावर ती व जुनी पानं मिळून सूर्यप्रकाश, पाणी व कर्ब वायू यांच्यापासून अन्नद्रव्य तयारकरतात. हे अन्नद्रव्य साखरेच्या स्वरुपात असते.
३. यातील बरीचशी साखर झाडाच्या निरनिराळया जैवीक क्रियेत खर्च होते. व काही साखर झाडात शिल्लक राहते.*जेवढे हे साखर शिलकीचे प्रमाण जास्त तेवढी बार फुटण्याची शक्यता जास्त.*
४. साखर तयार होण्याच्या क्रियेला फोटोसिन्थेसीस म्हणतात.*फोटोसिन्थेसीस*जेवढे जास्त तेवढी साखर तयार होण्याची क्रिया जलद होते.*साखरेला फोटोसिन्थेट असे म्हणतात.*
५. साखरेचा उपयोग करून नवती पक्की होते. म्हणजेच शेंड्याचा पोपटी हिरवा रंग जाऊन फांद्या फिक्कट हिरव्या बनतात, त्यावर पांढऱ्या उभ्या रेषा दिसतात. व त्या गोल होतात. अपक्व फांद्या त्रिकोणी, चापट व हिरव्या राहतात. त्रिकोणी व चापट फांद्यांवर बार फुटत नाही.
६.*नवतीमधे मोठया प्रमाणावर ऑक्झीन्स तयार होतात. नॉथलीन अॅसीड (एन ए ए) सदृष हे ऑक्झीन असते या आक्झीन्समुळे फुलं यार होण्याच्या क्रियेत बाधा निर्माण होते.*
७. झाडाला यावेळी भरपूर नैट्रोजन मिळाला तर ऑक्झीन्सचे प्रमाण वाढते व ऑक्झीनमुळे शेंडयाची अविरत वाढ होत राहते. त्यामुळे बार येण्यात बाधा निर्माण होते.
८. नवीन पानात व मुळात ऑक्झीन्स व जिबरेलीनस असतात. जिबरेलीनसमुळे पानात तयार झालेल्या साखरेचे विघटन होते व साखर जमा होत नाही. व बार फुटण्यास बाधा निर्माण होते.
९. नोव्हेंबरचा दुसरा पंधरवाड्यापासून पूढे डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडी पडते. व थंडीमुळे झाडामधे फुलं तयार करणारे हार्मोन - ॲबसिसीक अॅसीड - तयार होते.*या हार्मोनमुळे झाडाला बार फुटण्याकरता मदत होते.* पाण्याचा ताण बसला की झाडामधे ॲबसिसीक अॅसीड तयार होते
१०. फुलं आणणारे हार्मोन झाडात एकदा तयार झाले की ते नष्ट होत नाही व फुलं ही लागतातच.*फूट सुरु झाल्यानंतर
परत थंडी पडली तर कळया सुप्तावस्थेत जातात.* पण परत योग्य उष्णतामान झाले की कळया बाहेर येतात.
१.२: *नैट्रोजन व फुल लागण्याची क्रिया* :
नैट्रोजन जास्त झाल्यास झाडामधे अनेक क्रिया घडतात. पण या सर्व क्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे बार येण्यात बाधा पडते. त्याची कारणं खालीलप्रमाणे :
१. नैट्रोजनमुळे पानांची/फांद्याची वाढ होते. त्यामुळे साखर तयार होण्याचे क्षेत्र वाढते.
२. नैट्रोजनमुळे साखरेचे विघटन होण्याचे प्रमाण वाढते व साखरेचा साठा कमी होतो.
३. नैट्रोजनमुळे झाडाचा श्वासोच्छवास होण्याची क्रिया वाढते. श्वासोश्छवास होण्याची क्रिया घडवून आणण्याकरता __लागणारी शक्ति ही साखरेचे विघटन होऊन मिळते. म्हणून नैट्रोजन दिल्यामुळे साखरेचा साठा कमी होतो.
४.*बार आणण्याकरता बार येण्यापूर्वी ३-५ महिने नैट्रोजन देणे अजिबात बंद करावे लागते व झाडाला
नैट्रोजनचा उपास घडवावा लागतो. या उलट बार येऊ नये असे वाटत असेल तर नैट्रोजन चे प्रमाण वाढवावे.*
१.३:*पाण्याचा ताण व फुलं लागण्याची क्रिया* :
पाण्याचा मध्यम स्वरुपाचा ताण बसला की फुलं लागण्याच्या क्रियेत मदत होते. त्याची कारण खालीलप्रमाणे आहेत : पाण्याच्या ताणामुळे
१. फांद्याची/पानांची व मुळांची वाढ थांबते. मुळांना विश्रांती मिळते.
२. नैट्रोजनचे प्रमाण कमी होते. -
३. पानांवरील रंध्र बंद होतात व साखर तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
४. अॅबसिसीक अॅसीडचे प्रमाण वाढते, जिबरेलीन्स कमी होतात. व अनावश्यक वाढ थांबते.
५. सायटोकायनीनचे प्रमाण कमी होते.
६. पानांचा श्वासोच्छवास कमी होतो व साखरेचा साठा वाढतो.
७. पानांतील अन्नद्रव्य इतर भागात वाहून जाण्याची क्रिया मंदावते.
८. ज्या प्रमाणात पाण्याचा ताण बसेल त्या प्रमाणात फुलं लागण्याचे प्रमाण वाढते.
*फुलं लागण्याच्या प्रक्रियेकरता आवश्यक असणाऱ्या बाबी* :
१. पूर्ण वाढ झालेली निरोगी पाने.
२. पानांत साखर तयार करण्याची व साठवण्याची क्रिया.
३. हार्मोन्समधे बदल : ऑक्झीन, जिबरेलीन्स व सायटोकायनीन मधे घट तर ॲबसिसीक अॅसीड मधे वाढ.
४. फ्लोरीजेन तयार होण्यास योग्य परिस्थिती (थंडी/पाण्याचा ताण)
५. फ्लोरीजेन कोवळया फांद्यांच्या टोकाकडे वाहून जाण्याची क्रिया.
६. पानांचे फुलांमधे रुपांतर व कळया बनण्याची प्रक्रिया सुरु.
७. कळया दिसू लागतात.
१.४ *आंबिया बहार घेण्याची तयारी* : आंबिया बहार घेण्याची तयारी जून महिन्यापासून सुरु करावी. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो: सर्वप्रथम जून महिन्यात येणाऱ्या नवतीची वाढ करून घ्यावी.*काही बागामधे नवती फुटण्याची प्रक्रिया बंद झालेली आढळून आली आहे.* अशा बागांमधे जून जुलै महिन्यात पाऊस आल्यानंतर युरीया +झिंक+१०:२६:२६+गंधक+मॉलीब्डेनम+मँगनीज हे मिसळून फवारणी करावी. त्याच वेळी प्रत्येक झाडाला १ किलो युरिया, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट (किंवा १ किलो डीएपी) १/२ कि. मुरिएट ऑफ पोटॅश व १०० ग्राम झिंक सल्फेट द्यावे. जशी नवती फुटेल तशी नवतीवर बावीस्टीन + कॅप्टॅनची फवारणी करावी व हीच फवारणी परत १५ दिवसानी करावी. मुळांजवळ पाणी अजिबात साठू देऊ नये. झाडाच्याखालील आळे मोडून जमीनसारखी करावी.*पावसाची झड लागल्यास ऑक्सीजन पावडर वापरावी.*
नवती पक्की झाल्यानंतर म्हणजे ऑगस्ट महिन्यात मायक्रोन्युट्रीएंटची एक फवारणी द्यावी. मायक्रोन्युट्रीएंट चे ङ्केकिलेट वापरावे. मायक्रोन्युट्रीएट सोबतच माग्नेशियम सल्फेट व पोटॅशियम नैट्रेट द्यावे.*सप्टेंबर महिन्यात एक फवारणी बेनोमाईल + तेलाची द्यावी. ही अत्यावश्यक आहे. जुलैमधे पावसात उघाड पडल्यास सऱ्यातून पाणी सोडावे. पावसाची वाट बघू नये.*
ऑक्टोंबरच्या महिन्यात पहिल्या आठवडयात पाऊस न आल्यास हलके म्हणजे दांडातून पाणी द्यावे. भारी जमिनीकरता एकदा व जमीन हलकी असल्यास परत १५ दिवसांनी दुसऱ्यांदा पाणी द्यावे. पाणी दांडातूनच द्यावे. आळे भरू नये.
ऑक्टोंबर महिन्यात पानांचे निरीक्षण करावे.खालची पानं पिवळसर झाली असतील किंवा मोठ्या पानांच्या शिरा पिवळसर पडल्या असतील तर काहीच करण्याची आवश्यकता नाही. संत्रा फुटण्यापूर्वीची ही लक्षणं आहेत. पानं मोठी व हिरवीगार आणि मुलायम असतील तर मात्र झाडाला २-३ टोपले कच्चे शेणखत (म्हणजे या हंगामाचे शेणखत) व १-२ टोपले वाळलेले गवत टाकून वरच्या ३-४ इंचात मिसळून द्यावे. या वेळेस रासायनिक खत अजिबात देऊ नये.
नोव्हेंबर महिन्यात पानांचे निरीक्षण करावे. झाडाची जुनी पानं निरोगी असल्यास ऑक्टोंबर महिन्यात त्यात साखर तयार होते व ती पानांमधे साठते. त्यामुळे पानं कडक होतात. सवय झाल्यानंतर हाताने स्पर्श केल्यास हा कडकपणा ओळखता येतो. पान कडक झाल्यामुळे बार येण्यास मदत होते.
नोव्हेंबर महिन्यापासून व झाडांना पाण्याचा ताण द्यावा. त्याकरता *मुख्य मुळाजवळील माती काढून प्रमुख मुळं बुंध्यापासून एका फुटापर्यंत उघडी टाकावी व त्यानंतरच्या २-३ फुटातील मातीची ३-४ इंच उकरी करावी.* पानं हळूहळू कडक व्हायला लागतात व त्यात अॅबसिसिक अॅसीड तयार होते. अॅबसिसीक अॅसीडमुळे साखरेचे विघटन थांबते. परिणामी फांद्यामधे साखर जमा होते व बार फुटण्यास मदत होते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात युरीयाची फवारणी द्यावी.*या पद्धतीत आंबीया बहार हमखास फुटतो.*
नोव्हेंबर महिन्यापासून थंडी पडू लागते. व दिवस लहान होतो. थंडीमुळे झाडामधे फ्लोरीजेन (फूल तयार करणारे हार्मोन्स) तयार होण्याची क्रिया सुरु होते. ७-८ दिवस सतत कडाक्याची थंडी पडली तर फांद्याच्या टोकात कुलाच्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण याचवेळी पानामधे फुलाच्या पेशी तयार होऊ नये म्हणून हार्मोन तयार होते व पाण्याबरोबर ते फांद्यांच्या टोकापर्यंत वाहून जाते. त्यामुळे बहार येण्याच्या क्रियेत बाधा निर्माण होते. पाण्याचा ताण बसला तर ही क्रिया मंदावते व बहार फुटण्यास मदत होते. *म्हणून हिवाळयातही पाण्याचा ताण देणे आवश्यक असते.*
*नोव्हेंबर महिन्यात मुळं उघडी टाकल्यास जमीन थंड होते व त्याचा परिणाम म्हणजे मुळांची पाणी शोषण करण्याची क्रिया मंदावते. बहार फुटण्यापूर्वी हे होणे आवश्यक असते.*
थंडी पडल्यानंतर झाडांमधे फ्लोरीजेन (फुलांच्या पेशी तयार करण्यास उत्तेजित करणारे द्रव्य) तयार होते.* झाडाला थंडी किंवा उष्णतामानातील बदल जाणवण्याची क्रिया फांद्यांच्या टोकांत होते.* म्हणून पानं व फांद्या सशक्त व निरोगी असणे आवश्यक आहे.
पानांत तयार झालेल्या साखरेला पानांमधे असलेले रोगजंतु (फंगस व बॅक्टेरिया) खाऊन टाकतात. बोट्रायटीस (लहान फांद्या वाळणे), अॅन्थ्राक्नोज, शेंडेमर, सेप्टोरीया व आता कोलेटोट्रायकम, मायकोस्पोरेला आणि मिल्डयू या रोगांमुळे पानातील साखर नष्ट होते व बार कमी येतो.*या रोगांचा आधी बंदोबस्त करावा लागतो.* पावसाळ्यात हे रोग वाढतात. बहुतेक सर्वच बागात बोट्रायटीस, अँथ्रक्नोज मायक्रोस्पोरेला, मिल्डयु, डीप्लोडीया सारखे रोग मोठया प्रमाणावर पानगळ घडवून आणतात या रोगांचा पानांवर प्रादुर्भाव झाला तर बार फुटत नाही. फुटला तरी गळून जातो.
पानांची साखर तयार करण्याची शक्ति पानं सशक्त नसल्यास कमी होते. कोवळे पानं सूर्याकडे धरल्यास संपूर्ण हिरवे दिसावयास हवे. बहुतेक पानांमधे झिंकची पोटॅशची व नैट्रोजनची कमतरता दिसून येते. अशा पानात अन्नद्रव्य तयार होत नाही. म्हणून अन्नद्रव्याचा पुरवठा आधीच करावा. यामधे लोह, झिंक व मॅग्नेशियम महत्वाचे आहे. झिंकची तीव्र कमतरता असली तर नर फुलांचे प्रमाण आतोनात वाढते व नर फुलं गळून पडतात. त्यामुळे फुलं भरपूर दिसत असुनही फळांची संख्या कमीच असते. आपल्याकडे नर फुलांचे प्रमाण २५ ते ३५% च्या मधे असते. झिंकमुळे ते ७% पर्यंत खाली
येते.
१.५ *आंबिया बहार घेण्याची तत्व* :
१. सप्टेंबर महिन्यापूर्वी पानं सशक्त व निरोगी व रोगमुक्त असावी. त्याकरता रोगनाशकांची व मायक्रोन्युट्रीएंटस्ची फवारणी करावी. मायक्रोन्युट्रीएंटमधे मॅग्नेशियमच्या समावेश अवश्य करावा.
२. झाड रोगमुक्त असावे.
३. पानांमधे भरपूर साखर तयार होईल इतपत पाणी द्यावे. पानांमधील कडकपणा हे साखरेचे प्रमाण दर्शविते.
४. नोव्हेंबर पासून पाण्याचा ताण द्यावा.
५. पाणी धरून ठेवणाऱ्या जमीनीत नोव्हेंबर महीन्यात मुख्य मुळं २-३ आठवड्याकरता उघडी टाकावी.
६. नैट्रोजनयुक्त खत देऊ नये.
७. नैट्रोजनचा उपास घडवावा. फॉस्फोरस व पोटॅश देण्यास हरकत नाही.
८. साखरेचे विघटन होऊ नये म्हणून नोव्हेंबर महिन्यात हार्मोन फवारावे
९ डिसेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात १% युरीयाची फवारणी घ्यावी.
१०. जानेवारीमधे पाणी सोडावे. च्या पहिल्या आढवड्यात
१.६ *आंबिया बहार येण्यासाठी करावयाची कामे व वेळापत्रक* :
*महिना* *आठवडा* *करावयाची कामे*

*जून* १ पाणी द्यावे.
२ वरील प्रमाणे.
३ वरील प्रमाणे.
४ वरील प्रमाणे, पाऊस आल्यास पाणी देणे बंद करावे.

*जुलै* १
२ प्रत्येक झाडाला जुने शेणखत ३-४ टोपले, अर्धा कि. युरीया + १ कि. १० : २६ : २६ + ५० ग्रॅम झिंक द्यावे
३ बावीस्टीन + कॅप्टॅनची फवारणी द्यावी.
४ बावीस्टीन + कॉपर ऑक्सीक्लोराईडची फवारणी द्यावी.

*ऑगस्ट* १ शेतामधे दांड काढावे किंवा चर काढावे व पाणी साठणार नाही अशी व्यवस्था करावी, (महत्वाचे) ऑक्सीजनची पावडर टाकावी.
२ -
३ पाऊस न आल्यास दांडाने हलके पाणी द्यावे.
४ -
*सप्टेंबर* १ बावीस्टीन + कॅप्टॅन + कॉपर आक्सीक्लोराईड + मॅग्नेशियम सल्फेट + पोटॅशियम नैट्रेटची फवारणी करावी.
२ -
३ पाऊस न आल्यास दांडाने हलके पाणी द्यावे. पाऊस न आल्यास दांडाने हलके पाणी द्यावे.
४ पाऊस न आल्यास दांडाने हलके पाणी द्यावे. पाऊस न आल्यास दांडाने हलके पाणी द्यावे.

*ऑक्टोंबर* १ साखरेचे विघटन होऊ नये व साखर तयार करण्याकरता हार्मोन फवारावे, मुळं उघडी करावी.
२ कच्चे शेणखत काडीकचरा, वाळलेले किंवा तण इत्यादी प्रत्येक झाडाला २-३ टोपले देऊन उकरी करावी व पाणी दयावे.

*नोव्हेंबर* १ पानामधे साखर जमा झाली का पाहावे. साखर जमा झाल्यास जुनी पानं कडक येतात. हार्मोनची दुसरी फवारणी द्यावी.
२ झाडाजवळून खोल नांगरटी करावी व पाणी बंद करावे.
३ पाणी बंद ठेवावे.
४ पाणी बंद ठेवावे.

*डिसेंबर* १ -
२ -
३ १% युरीयाची फवारणी द्यावी.

*जानेवारी* १ साधारण १ जानेवारीला प्रत्येक झाडाला १ कि. युरीया २ कि. सुपर फॉस्फेट/किंवा २३ : २३ : ०, अर्धा कि. पोटॅश द्यावेव पाणी सोडावे. बार फुटल्यानंतर प्रत्येक झाडाला परत १ कि. युरीया द्यावा.

गुजरात केशर आम के पौधे तैयार है 9752421967
30/06/2020

गुजरात केशर आम के पौधे तैयार है
9752421967

22/04/2020

During our ground coverage of Maharashtra assembly elections 2019, Team Lallantop reached orange city Nagpur. Nagpur is famous for oranges. To understand the...

खिरनी गर्मी के मौसम में पकने वाला निंबोली के आकार का एक फल है। आजकल यह बाजार में कभी-कभी ही दिखता है। इसे संस्कृत में क्...
12/09/2019

खिरनी गर्मी के मौसम में पकने वाला निंबोली के आकार का एक फल है। आजकल यह बाजार में कभी-कभी ही दिखता है। इसे संस्कृत में क्षिरिणी कहा जाता है जिसका अर्थ होता है क्षीर यानि ऐसा फल जिसमें दूध भरा हो। इसके फलों और पत्तों को तोड़ने पर भी दूध निकलता है। गुणों के आधार पर इसे फलों का राजा माना गया है। प्राचीन काल में इसका सेवन राजाओं द्वारा किया जाता था, इसलिए आयुर्वेद में इसे राजदान, राजफल एवं फलाध्यक्ष आदि नामों से भी जाना जाता है।

सपोटेसी कुल के इस वृक्ष का वानस्पतिक नाम मनिलकरा हेक्सान्द्रा है। खिरनी के पेड़ 3-12 मीटर लंबे होते हैं और मुख्यतः जंगलों में पाए जाते हैं। हालांकि इसके फल स्वादिष्ट होने के कारण इसे ऊष्णकटिबंधीय क्षेत्रों में उगाया जाने लगा। खिरनी का पेड़ भारत में उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, तमिलनाडु आदि जगहों पर पाया जाता है। खिरनी के पेड़ भारत के अलावा चीन, श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार, थाईलैंड, कंबोडिया और वियतनाम में भी पाए जाते हैं।

खिरनी के पेड़ों पर सितंबर से दिसंबर के महीनों में फूल लगते हैं और अप्रैल से जून के महीने में फल पकते हैं। बारिश आने पर इसके फलों में कीड़े लगने लगते हैं। खिरनी के पेड़ की लकड़ी बहुत मजबूत और चिकनी होती है। यदि किसी तरह से नुकसान नहीं पहुंचाया जाए, तो खिरनी के पेड़ एक हजार साल तक जीवित रहते हैं।

इसके विशाल पेड़ों को मध्य प्रदेश के मांडू क्षेत्रों में बहुतायत में देखा जा सकता है। मांडू को राजाओं का स्थान माना जाता है। आजकल इसके बीजों को उगाकर जब वह दो से ढाई फुट का हो जाए तब उसे काटकर उसमे चीकू की कलम प्रत्यारोपित की जा रही है, जिससे बहुत स्वादिष्ट चीकू का फल उत्पन्न होता है।

खिरनी का फल मीठा होता है और बड़े शहरों में यह ऊंचे दामों पर बिकता है। इसके पत्तों का इस्तेमाल मवेशियों के लिए चारे के रूप में किया जाता है। खिरनी के पेड़ की छाल से निकालने वाले गोंद का इस्तेमाल चमड़े की सफाई के लिए किया जाता है। इसके छाल का इस्तेमाल शराब बनाने के लिए किया जाता है और छाल का काढ़ा ज्वर नाशक होता है। इसके पके फलों को सुखाने पर वे ड्राईफ्रूट का अच्छा विकल्प हो सकते हैं।

खिरनी का इस्तेमाल आयुर्वेदिक और ज्योतिषीय उपचार के लिए भी किया जाता है। आयुर्वेद के अनुसार इसके फल शरीर में शीतलता लाते हैं, यह मधुर स्निग्ध एवं पचने में भारी होता है। यह फल शरीर को मोटा करने वाले होते हैं, अतः दुबले लोगों के लिए हितकारी है। चरक चिकित्सा के माषपर्णभृतीयं अध्याय में खिरनी को जीवनीय की श्रेणी में रखा गया है, जिसका अर्थ होता है जीवन देने वाला। ज्योतिष शास्त्र में खिरनी के जड़ को चंद्रमा के प्रतीक रत्न मोती के स्थान पर धारण किए जाने की सलाह दी गई है।

खिरनी के बीजों से पीले रंग का तेल निकलता है। इसका इस्तेमाल खाद्य तेल के रूप में किया जाता है। खिरनी का तेल औषधीय गुणों से भरपूर है। जर्नल ऑफ एथनोफार्माकॉलोजी में प्रकाशित एक अध्ययन के अनुसार देवताओं द्वारा सम्मानित, हमेशा सत्य बोलने वाले और दैवीय वैद्य अश्विनी कुमारों ने एक ऐसे स्वास्थ्यवर्धक तेल का निर्माण किया था, जो किसी भी रोग से लड़ने में सक्षम था। इस तेल का नाम उन्होंने “अमृत तैल” रखा। इस तेल का इस्तेमाल उस जमाने में राजाओं द्वारा किया जाता था। इस तेल के निर्माण में अन्य औषधियों/वनस्पतियों के
साथ ही खिरनी के बीज के तेल का भी इस्तेमाल किया गया था।

माया सभ्यता के दौरान भारत, मेक्सिको क्षेत्रों और मध्य अमेरिका के लोग परम्परागत रूप से खिरनी से निकलने वाले गोंद का इस्तेमाल च्यूइंग गम के तौर पर करते थे। जिस समय पूर्व-कोलंबियाई एजटेक सभ्यता अपनी बुलंदी पर थी, एजटेक वेश्याएं अपने व्यापार के प्रचार के लिए खिरनी के गोंद से बनी च्यूइंग गम को जोर से काटती थी, जिससे कि ग्राहक उनकी तरफ आकर्षित हो सकें।

औषधीय गुण

मध्य प्रदेश के झाबुआ जिले के भील, भिलाला और पटाया आदिवासी समुदाय खिरनी के पेड़ का औषधीय इस्तेमाल पारंपरिक रूप से करते आए हैं। ये आदिवासी समुदाय शरीर के दर्द का इलाज करने के लिए खिरनी की छाल को उबालकर उस पानी से नहाते हैं। खिरनी के औषधीय गुणों की पुष्टि वैज्ञानिक अनुसंधानों से भी होती है।

वर्ष 2000 में मेडिसिनल प्लांट्स नामक जर्नल में प्रकाशित एक शोध के अनुसार खिरनी एक औषधि के तौर पर पीलिया, बुखार, जलन, मसूढ़ों में सूजन, अपच आदि रोगों के उपचार में कारगर है। वर्ष 1985 में एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन मेडिसिन में प्रकाशित एक अध्ययन बताता है कि खिरनी खून को साफ करता है और सूजन, पेट दर्द और खाद्य विषाक्तता को दूर करता है। इंडियन मेडिसिनल प्लांट्स नामक जर्नल में वर्ष 2007 में प्रकाशित शोध के अनुसार खिरनी में अनेक प्रकार के ऐसे तत्व होते हैं जो शरीर की अंदरूनी कई जैविक क्रियाओं को नियंत्रित करने में सक्षम हैं।

व्यंजन : खिरनी की आइसक्रीम

सामग्री:
खिरनी : 300 ग्राम
दूध : 1/2 लीटर
क्रीम : 200 ग्राम (1 कप)
चीनी : 100 ग्राम
कंडेंस्ड मिल्क : 100 मिली
विधि: खिरनी को अच्छी तरह धोकर उसके बीज निकाल दें। अब इसे मिक्सी में पीसकर इसकी प्यूरी बनाकर रख लें। इसके बाद एक बड़े कटोरे में क्रीम, दूध, कंडेंस्ड मिल्क और चीनी का मिश्रण बना लें। अब इस मिश्रण को हैंड मिक्सर से हाई मोड पर 15 मिनट तक फेंटिए। जब मिश्रण फूलकर दोगुना हो जाए तो उसमें खिरनी की तैयार प्यूरी डालकर 10 मिनट के लिए फिर फेंटिए। अब आप देखेंगे कि मिश्रण बिलकुल स्मूथ हो गया है। अब इस मिश्रण को एयरटाइट कंटेनर में डालकर फ्रीजर में 6-8 घंटे के लिए रख दीजिए। लीजिए तैयार है खिरनी की ठंडी-ठंडी आइसक्रीम। जब भी आइसक्रीम खानी हो, कंटेनर को फ्रीजर से बाहर निकालकर 5 मिनट के लिए छोड़ दीजिए। अब एक स्कूप से आइसक्रीम के गोले निकालिए और परोसिए।

आंबिया बहार घेणाऱ्या संत्रा व मोसंबी बागायतदारांनी या महिन्यात संत्रा फळांची योग्य वाढ होण्याकरिता तसेच फ़लगळ थांबविण्यास...
01/08/2019

आंबिया बहार घेणाऱ्या संत्रा व मोसंबी बागायतदारांनी या महिन्यात संत्रा फळांची योग्य वाढ होण्याकरिता तसेच फ़लगळ थांबविण्यासाठी २-४-डी १.५ ग्राम+१.५ कि ग्राम पोटाशियम नाट्रेट+३०० ग्राम बोरिक अम्लाची तसेच २० दिवसाच्या अंतराने जी.ए.३ १.५ ग्राम+१.५कि ग्राम यूरिया+१०० ग्राम कार्बनडाझीम ची फवारणी करावी. १किलो १८:१८:१० मिश्र खत+२००ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट झाडांना द्यावे. सिट्रस ग्रीनिंग जीवाणु पासून होणाऱ्या वायवार फळाचा नियंत्रणासाठी स्टेपस्टोसायक्लीन १० ग्राम+३०० ग्राम कॉपर ओक्झीक्लोरेड १००लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी अशी विनंती डॉ. एम.एस. लदानिया, संचालक, सी सी आर आय नागपुर यांनी संत्राबगायत दारांना केली आहे.

Address

Warud Dist Amravati
Bhopal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prerna nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category