13/03/2026
आज महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील कन्नड भाषिक बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत बेळगाव येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मिरज, गडहिंग्लज तसेच इतर भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांना शिक्षण, रोजगार, शेतीस पूरक सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांना दीर्घकाळापासून सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्नाटक शासनाच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशी यावेळी मागणी केली.
सीमाभागातील कन्नड भाषिक बांधवांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील काळातही ठोस प्रयत्न करत राहू.
#सीमाभागप्रश्न #जत