30/12/2016
जनसामान्यांचा आधार: लोकनेते बाळासाहेब विखे पाटील
पाच दशकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात गरीब माणसासाठी नवनिर्मितीचा विचार करताना मा.खा.बाळासाहेब विखे यांनी केलेले काम पाहता ग्रामीण भागाला लाभलेले हे नेतृत्व खर्या अर्थाने सामान्यांचे आधार ठरले आहे. सहकार, शेती, सिंचन, शिक्षण या क्षेत्रात त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले आहे. पद्मश्रींचा वारसा पुढे चालवताना ग्रामीण अर्थकारणाच्या सक्षमीकरणासाठी व जनतेला प्रगतीसाठी नवनवीन संधी त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. शेतीच्या विकासाशिवाय देशाचा विकास होवू शकत नाही, ही ठाम भूमिका दिल्लीतील बुद्धीजीवी वगार्पूढे मांडूनश्रमजीवी वर्गाला न्याय देण्याचे काम खा.विखे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाचा आरंभ करणार्या खा.विखे यांनी विविध संस्था, संघटना, समित्यांबरोबरच लोकसभा व केंद्रीय मंत्रिमंडळात काम करताना आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून देशात आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली. खुल्याअर्थव्यवस्थेमुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण जनतेला मदतीचा हात देवून त्यांना सक्षम बनवण्याचे काम मा.खा .विखे यांनी केले. केंद्रात अर्थ राज्यमंत्री असताना अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागासाठी ७५ हजार कोटींची तरतूद खा.विखे यांनी केली होती.
देशाच्या इतिहासात हा उच्चांक होता. शेती, शेतकरी व शेतीच्या व्यवसायावर अवलंबून असलेले घटकांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास मा.खा.विखे यांनी घेतला असल्याने त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसते. मा.खा.बाळासाहेब विखे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा कालखंड चार दशकांचा आहे. जिल्हा परिषद ते केंद्रात अर्थ राज्यमंत्री व उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापयर्ंतचा हा प्रवास आहे. प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. १९८0 पासून ते भारत-सेव्हिएत मैत्री संघाचे अध्यक्ष आहेत. १९८१ ते ८४ या काळात ते राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते २५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. लोकसभेच्या पिटीशन कमिटीचेही ते अध्यक्ष होते. याशिवाय विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले. राज्यातील पहिले खासगी तंत्रनिकेतन १९८0 मध्ये प्रवरानगर येथे सुरु करुन ग्रामीण भागात शिक्षणाचीचळवळ सुरु करण्याची मुहूर्तमेढ खा.विखे यांनी रोवली. नंतर राज्यात विविध ठिकाणी शंभरहून अधिक तंत्रनिकेतने सुरु झाली. अभियांत्रिकी व वैद्यकीयमहाविद्यालयांनाही परवानगी मिळाली. शिक्षणाची दारे शेतकरी, शेतमजूरांच्या मुला-मुलींना खुली करण्याचे ऐतिहासिक काम विखे यांनी केले. राज्याच्या राजकारणात इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून बाळासाहेब विखे ओळखले जात. काँग्रेसच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा शब्द इंदिराजी कधीही डावलत नसत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना अनेकदा संधी असताना त्यांनी इतरांना हे पद मिळवून दिली. काम करणाराला सत्तेचे पाठबळ आवश्यक असले, तरी खा.विखेंचे सर्वांशी असलेले चांगले संबंध व काम करुनघेण्याचे कौशल्य या बळावर सत्तेपासून दूर असूनही विकासकामांचा वेग वाढत आहे. १९९९ मध्ये ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री झाले. अर्थ राज्यमंत्री असताना त्यांनी ऐतिहासिक असे काम केले. त्या जोरावरच त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. महाराष्ट्राच्याग्रामीण भागातील शेतकर्यांच्या शेतमजूरांचा हा खरा सन्मान होता. प्रवरा परिसरांत ते कायम खासदार साहेब म्हणुन राहिले.केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता ..